शनिवार, २० एप्रिल, २०१३

बलात्कार मीमांसा



 
- डॉ. सुधीर रा. देवरे

       सोळा डिसेंबरच्या दिल्लीतील बलात्कार कांडानंतर आजपर्यंत देशात बलात्कारांची संख्या आधीच्या तुलनेत वाढली आहे. तीही दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. बलात्कारांत क्रूरपणाही कल्पनेहून भयंकर आहे. देशभर इतकी चर्चा झाली. इतकी निदर्शने झालीत. कायदे केले गेले. वटहुकूम काढला गेला. काल- परवा तर आपसात समझदारीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय अठरा वरून सोळावर आणण्याचा प्रयत्न झाला आणि तो पुन्हा मागे घेण्यात आला. तरी ही संख्या का वाढते आहे, हा चिंतनाचा विषय आहे. आधीच्या काही वर्षांच्या तुलनेत हा विचार आता शांतपणे आणि अनेक पातळ्यांवर करावा लागेल.
         खरे तर ही संख्या वाढली म्हणजे दिल्लीच्या घटनेनंतर बलात्कार झाल्यावर गुन्हा नोंदवण्याचे प्रमाण वाढले असे म्हणावे लागेल. त्या आधीही गुन्हे घडतच होते. बलात्कार होतच होते सर्वत्र, पण पोलिसात तक्रार देण्याचे टाळले जात होते म्हणून ते कागदोपत्री येत नव्हते असे म्हणावे लागेल. घटना घडली आहे तिचा बोभाटा करून इज्जत घालवण्यापेक्षा असे गुन्हे दाबण्याकडेच सर्वसाधारण माणसांचा कल होता, त्याला थोडी चालना मिळून आज गुन्हे नोंदवण्याचे प्रमाण वाढले आहे.
         बलात्कारावर आपण वरवर चर्चा करतोय असे वाटते. मुळ मुद्दा वा पायाबध्द विचार करत नाही. दिवसेंदिवस लग्नाचे वय वाढतेय. शिक्षणात बरेच आयुष्य खर्ची पडायला लागले. पुरूषांची 26 ते 35 वयादरम्यान लग्न होऊ लागलीत आणि स्त्रियांची 25 ते 32 वयादरम्यान लग्न होऊ लागलीत. दुसरीकडे लैंगिक आकर्षण वाटण्याचे वय कमी होत आहे. आज ते सरासरी 14 असू शकते. यात चित्रपट, इंटरनेट, टीव्ही, मोबाईल, ब्ल्यू फिल्म वरून लोक जास्त माहिती मिळवू लागलीत. (ज्ञान नव्हे, ज्ञान होणे आणि माहिती होणे यात फरक आहे. आपण माहितीला ज्ञान म्हणतो. आता दिल्लीत पाच वर्षाच्या मुलीच्या योनीशी जे क्रूर कृत्य केले गेले ते लैंगितेची अशास्त्रीय फिल्म पाहिल्यामुळे असू शकते.)
         अशा पध्दतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे खर्‍या ज्ञानाऐवजी विकृत माहिती उपलब्ध होते. तरूणांमध्ये वाढत्या वयात निसर्गनियमानुसार निर्माण झालेली लैंगिक ऊर्जा बाहेर पडायला हवी असते. ती तशी बाहेर पडत नसेल तर कुठे तरी वळवायला हवी असते. तशी ती कुठेच वळवली जात नसल्याने परिणामांना न घाबरता बलात्कारासारख्या घटना घडतात, हे आपण लक्षात घेत नाही. कायदे करून काही होणार नाही. गुन्हे घडणार नाहीत यासाठी काहीतरी केले पाहिजे.
         आज तरूण तरूणीच नव्हे तर चाळीशी उलटलेले लोक सुध्दा शास्त्रशुध्द लैंगिकतेवर बोलायला घाबरतात- टाळतात. कोणी तसे बोलायला लागले की बोलणारा अनितीमान- अनैतिक ठरवला जातो. (पण चोरूनलपून अशास्त्रीय फिल्म मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात.) लैंगिकता ही जशी काही परग्रहावरची बाब आहे असे आपण सर्वच भासवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच ते भयावह आहे. कारण अशा दाबलेल्या वासना कुठेतरी- केव्हातरी फणा उभारतात. असे जोपर्यंत आपण सोवळेओवळे पाळत राहू तोपर्यंत कितीही कायदे केले तरी बलात्कारांची संख्या कमी होईल असे वाटत नाही, हे दुर्दैवाने सत्य आहे.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

४ टिप्पण्या:

  1. अगदी व्यवस्थित आणि साध्या सरळ शब्दांमध्ये तुम्ही हा विषय हाताळला आहे .

    उत्तर द्याहटवा
  2. deshat rojch balatkarachya ghatana ghadat aahet..pan ashya ghatana ghadu nayet mhanun thos upayancha awalab karnya peksha thikthikani charcha satra rabawale jaat aahet hi khup khadachi bab aahe.. samajat vikruti wadhanyachi karane aapan agadi barobar sangitali pan ekhadya chimurdibabat ashi ghatana ghadali ki khup santap hoto ...tyahun jasta tewha jewha he rajkarani lok / bhawana shunya lok ya ghatananwar tippani karatat.

    उत्तर द्याहटवा