रविवार, १५ डिसेंबर, २०१९

अहिराणीनी बात


- डॉ. सुधीर रा. देवरे

महाराष्ट्रमा मराठीन्या तशे पाह्य त्ये पासष्ट बोलीभाशा दखातीस. त्या बठ्ठास्मा अहिराणी भाशाना पट्टा आडवा उभा भयान मोठा त्ये शेच, पन ह्या पट्टामजारला आथा तथा कामसकरता जायेल लोक महाराष्ट्रभर आनि महाराष्ट्रना बाहेरबी आपली भाशा इमाने इतबारे बोली र्‍हायनात- समाळी र्‍हायनात. नाशिक सिडको, औरंगाबाद, पुना, मुंबई, सुरत आशा काही शहरस्माबी आज अहिराणी भाशा हात पाय पसरी र्‍हायनी. (आज अहिराणी बोलनारा लोक येक कोटीना आसपास दखातंस.)
शिकेल सवरेल लोकसतीन अडानी लोकस्ले अहिराणीवाचू दुसरी भाशा येत नही म्हनीसन का व्हयेना त्या नाइलाजे आपापला घरमा- गावमा अहिराणीमा यव्हहार करतंस. अहिराणी भाशा बोलाले त्या अजिबात सरमातं नहीत. याना उलट शिकेल सवरेल लोकं आपली भाशा जतन करानं ते दूरच शे पन ती भाशा आपुले कशी अजिबात येत नही हायी आजूबाजूना बिगर अहिराणी लोकस्मा दखाडाले उतावळा आंबा पिकाडतंस. म्हंजे आपली मायबोली अहिराणीले त्या सोताच गावंढळ भाशा समजतंस. बाकिना आपला आजूबाजूना शिकेल सवरेल लोक आपली बोलीभाशाले गावंढळ समजतं व्हतीन, आशे त्यासले वाटस. (आशा बळेजना समज मनमातीन काढाकर्ता अहिराणी याळना माळेक उच्‍छाव लोकस्मा भाशा जागरन कराकर्ता हाटकून व्हवाले पाहिजेत.)
 बोलीभाशा बोलाले सरमावाना कारनंस्मातलं येक कारन, आपू उलसा व्हतून तैनपशी शाळमा शिकाडानी पध्दतबी शे. लहानपनपशी शाळमा कोनी अहिराणी बोलनं ते गुरजी- सर आशा पोरस्नी टिंगल करेत, हाऊ आनभव सगळास्ले येवामुळे आमनी भाशा गावंढळ शे आशी आपला मनमा हायी कायमनी आढी बठी गयी. (आतानं शिकशन शासरं बोली भाशामा शिकाडानी कोशीश करी राह्यनं.) जठे जठे मराठी भाशा बोलतंस तठे चार मानसस्मा बोलानी हायी भाशा नही, आशा समज करीसन अहिराणी बोलाले त्या चरकतंस.
     आडवा उभा उत्तर महाराष्ट्रना जवळजवळ दोनशे मैल डोंगरखाल ते तीनशे मैल सूर्यखालना पट्टा हाऊ अहिराणी भाशाना पट्टा शे. या पट्टामा धुळा, नंदुरबार, जळगाव आनि नाशिक या चार जिल्हा शेतंस. ‍धुळा नंदुरबार ह्या आख्खा जिल्हा आणि नाशिक - जळगाव ह्यास्ना निम्माशिम्मा भाग अहिराणी बोलस. आवढा मोठा मचनच याप आपली अहिराणी बोलीना शे. (म्हनीसनच ह्या सगळा पट्टाले आजबी खानदेश म्हननं पडयी.) महाराष्ट्रमजार कोकनी भाशा सोडी ते आवढा मोठा पट्टा दुसरी बोली भाशाना ‍कथा दखात नही. (ह्या पट्टामजारला काही आदिवाशी भाऊ त्यास्न्या सोतान्या जराश्या येगयेगळ्या भाशा बोलतंस, तरी त्या भाशास्वरबी अहिराणीना पक्का पगडा टहाळबन दखासच.)
     अहिराणी बोलीना इतला सावठा आडवा उभा याप व्हयी आनि जर परत्येक दहा मैलवर भाशा बदलाना भाशाना आंगनाच नेम व्हयी ते आपली अहिराणी बोलीच तव्हढी आठून तठून जशीनतशी आनि तिनामा कोनताबी बदल न व्हता कशी दखाइ? भाशा शासरंना नियमखाल तिनामा त्या त्या तालुकास्मा, जिल्हास्मा, गावस्मा बदल दखावालेच जोयीजे. तिना काही शब्द, काही वाक्य, काही हेल यास्मा बदल दखाइच. कोनतीबी आनि कितीबी उलसा भागनी भाशा राहिनी तरी थोडाबहुत बदल हाऊ तिन्हा मुळना सभावच र्‍हास. जशा तो अहिराणी भाशामा आठोंग तठोंग दखास. हायी महाराष्ट्रभरन्या आपल्या जठल्यातठल्या सगळ्याच बोली बोलनारा लोकस्ले ठाऊक शे. म्हनीसन बाकिन्या बोलीस्ना लेखक, इदवान लोक येकच भाशाना थोडाबहुत बदलले कमी बहुत समजतं नहीत. शुध्द- अशुध्द समजतं नहीत. आमना जिल्हामजारली अमुक बोली खरी आणि तमुक जिल्हामजारली भाशा आमनी भाशातीन कमी दरजानी शे, आशे कोनीच आनि कोनतीच बोली भाशाना लोकस्नी म्हनाले नको. आशी अस्सलबिस्सलनी चावळ बोली भाशास्मा व्हत नही आनि परमान भाशास्माबी व्हत नही. म्हनीसन कोनतीबी भाशा र्‍हाव, कोनीबी लोकस्नी त्या भाशाले आठून तठून येकच भाशा समजाले पाहिजे.
     अहिराणी बोलीना लेखक आनि इदवान लोक यास्नी हायी गोट हाटकून ध्यानात घेवा. अहिराणी हायी अमूक जिल्हानी भाशा शुध्द आणि अमूक जिल्हानी भाशा देढगुजरी आशी चावळ कोनी करू नही. आशी चावळ जयी त्ये आपला अहिराणी पट्टानं बाहेर आशा परचारना काय पर्‍हेड व्हस, हायी कोनले सांगानी गरज नही.
     समजा सकाळ पुनाना लोकस्नी बैठक जयी. आनि त्यास्नी व्यासपीठ वरथीन सांगं, ‘‘पुना हायी मराठी भाशानं केंद्र शे. म्हनीसन पुनानी मराठी हायीच खरी अस्सल शुध्द मराठी भाशा शे. बाकी महाराष्ट्रमा सगळा लोक जी मराठी बोलतंस ती मराठी अशुध्द शे. तिनामा ज्या लोक पुस्तकं लिव्हतंस त्या सगळा अशुध्द शेतंस. म्हनीसन आमनी पुनेरी भाशा सगळा महाराष्ट्रनी शिकी घेवाले पाहिजे आनि तिन्हामाच बोलाले पाहिजे, लिव्हाले पाहिजे.’’ आशे जर कोनी सकाळ म्हनं ते आक्‍खा महाराष्ट्रमा काय व्हयी, सांगा बरं? जे काय व्हयी, त्ये व्हऊ नही म्हनीसनच आशे कैन्हबी व्हनार नही. याना आरथं आशा शे, अहिराणी पट्टामजारला येखांदा गावले नहीथे येखांदा जिल्हाले, आमनीच भाशा खरी अहिराणी शे आनि तमूक जिल्हानी नही,’ आशे म्हनता येनार नही.
     आपला गावशिवना जिव्हाळा कोनलेबी र्‍हायीच हायी खरं शे. आपली गावशिवनी भाशाले जीव लावनंबी खरं शे. पन मन्हीच भाशा खरी आशी घमेंड कयी ते आपलं सोतानं नही पन आपली सगळास्नी जी भाशा शे अहिराणी, तिन्ह नुकसान नक्की व्हयी. म्हनीसन आठला सगळा लेखक, इदवान आनि अहिराणी भाशा बोलनारा सगळा भाऊस्ले मी कळकळन्या रावन्या करी र्‍हायनू, सगळा चार जिल्हासनी आपली भाशा आपू आपलीच म्हनूत. बागलानी (नाशिक जिल्हानी) हायी जशी मन्ही भाशा शे तशी जळगावनी अहिराणीबी मन्हीच भाशा शे, नंदुरबारनी भाशाबी मन्हीच शे आनि धुळानी भाशाबी मन्हीच शे. आनि अहिराणीनी बात करता करता बाकिन्या बठ्ठ्या बोलीभाशाबी मन्ह्याच शेतीस. बाकिन्या भाशा परक्या नहीत.
     कोनतीच भाशा कमअस्सल र्‍हात नही आनि अस्सलबी र्‍हात नही. म्हनीसन आपू आपला गावपुरती भाशानी पोकळ घमेंड मनातीन काढीसन अहिराणी हायी आठून तठून येकच अहिराणी समजूत आनि ती यानंमोर्‍हे कशी जगयी वाचयी हायी ध्यानमा ठीसन तिनाकर्ता राबूत. अहिराणीना याप आशा भयान सावठा शे, पन भाशानी घमेंड करू नही. भाशाले जीव लायी हयाती राहू दिऊत. आशे कर्ता कर्ता आपू जगमजारल्या सगळ्या भाशास्ले जीव लाऊत, जरी त्या आपुले समजती नहीत.
     (मालेगावले आत्तेच अहिराणी दिनना वाजीगाजी जागर जया. म्हनीसन ‍अहिराणी बोलीना चारीमिरे गजर जया. त्या निमितखाल हायी मनचावळ. नचिकेत कोळपकर, राजेंद्र दिघे, स्वाती वाणी आनि राष्ट्र सेवा दलना सोबत कितीतरी नावं घेता इतीन आशा गंजच बठ्ठा लोकस्नी रातदिन राबीसन खस्ता खायी हाऊ अहिराणी लोकसंस्कृतीना जागर साजरा कया. भाशनंबिशनं हाटकून टाळीसन दुन्याले अहिराणी लोककलास्नं उजाळं दखाडं, जेवालेबी अहिराणी जिनसा वाढ्यात. म्हनीसन सगळास्न कौतीक.)
     (अप्रकाशित. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
 ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

रविवार, १ डिसेंबर, २०१९

सृजनाचा व्यायाम


- डॉ. सुधीर रा. देवरे

     सिनियर लेखकाशी ज्युनियरचं प्रत्यक्ष वा फोनवर बोलणं होत राहतं. प्रत्येक वेळी जशी मागची उजळणी होते तसे बोलण्यात नवे मुद्देही येत राहतात.
     परवा सिनियर बोलता बोलता ज्युनियरला म्हणाले, "व्यायाम करतोस ना रोज?
     "होय करतोय ना. जोरात चालण्याचा व्यायाम करतो. सूर्य नमस्कार नाही करत आता. झेपत नाही. शिर्षासन करायचो पण आता वय आणि वजन वाढल्यामुळे तेही नाही करत.’ असं म्हणून ज्युनियरने सिनियरला बोलायला स्पेस दिली.
      स्पेस मिळताच सिनियर बोलू लागले, "बरोबर, आता या वयात नाही करू शिर्षासन. मानेला त्रास होतो. एक कल्पना डोक्यात येऊन गेली परवा: जे अवयव हलवता येत नाहीत त्यांचा व्यायाम कसा करायचा. उदाहरणार्थ, काही अवयव सांगतो तुला. मुत्रपिंडाचा व्यायाम करता येईल का? कसा करायचा? माणसाला कान हलवता येत नाहीत. छोटे असतात ना म्हणून. बाकी प्राणी त्यांचे कान फडफडवतात. म्हणजे व्यायामच करतात ना कानांचा. माणसाला कानांचा व्यायाम कसा करतात हे शोधून काढावं लागेल. कपाळाचा व्यायाम कोणालाच करता येत नाही. प्राण्यांनाही नाही. नाकाचा व्यायाम कसा करायचा. हृदय- काळीज, यकृत यांचा व्यायाम कसा करायचा? ज्या अर्थी आपण डोळ्यांचा व्यायाम करतो त्याअर्थी कपाळ, हृदय, यकृत, कान, नाक यांचा व्यायाम का करू नये? एका लेखकाने यकृत, हृदय नावाची नाटके लिहिलीत हे माहिती आहे ना तुला?
 ‘हो. श्याम मनोहर ज्युनियर म्हणाला.
 ‘बरोबर
आतड्यांचा व्यायाम आपोआप होत असावा. जिभेचा व्यायाम आपोआप होतोय. दातांचा व्यायाम आपोआप होतो. नाकाचा आणि कानांचा आपोआप होतो की नाही मला माहीत नाही.
 ‘कठीण आहे सगळं. खूप सुचतंय सर तुम्हाला
हो, आणि हे कुठं द्यायचा प्रयत्न करू नकोस तू. फेसबुक, व्हॉटसअॅप बिटसअॅप वर देऊ नकोस. माझ्या नावासहीत द्यायचं झालं तरी देऊ नकोस. अशीच एकाशी फोनवर चर्चा केली आणि त्याने फेसबुकवर पोस्ट करून दिली. माझ्या नावानिशी. दिली तर दिली पोस्ट. माझी काही वाक्य त्याच्या नावावर खपवून टाकली त्याने. सिनियर श्वास घेण्यासाठी थांबले. म्हणून ज्युनियर म्हणाला,
     तुम्ही जे काही बोलतात ना वाचकांशी ते तुमच्या कादंबरीत येत असतं पुढं मागं, हे मला माहीत आहे. म्हणून मी ते इतरत्र कुठं देत नाही आणि खाजगीतही सांगत नाही मित्रांना.
     हो मला माहीत आहे ते. विश्वास आहे तुझ्यावर. तू नाही देणार हे कुठं. हं तर आपण काय बोलत होतो. व्यायामाविषयी. व्यायाम हा सर्वव्यापी आहे. शरीराच्या आतल्या आणि बाहेरच्या अवयवांच्या व्यायामाविषयी आपण बोलत होतो ना?
हो सर
     सिनियर तंद्री लावत म्हणाले, मेंदू आणि प्रतिभा हे काय आहे? मेंदू नावाचा आपल्या डोक्यात एक अवयव आहेच. पण प्रतिभा कुठं आहे? प्रतिभा हा अवयव नाही. मग लेखकात ती येते कुठून? मेंदूचा व्यायाम शक्य आहे. अनेक नवनवीन शोध हे मेंदुच्या व्यायामामुळेच शक्य झालेत असं म्हणता येईल. आणि कलांचा उद्‍गम हा प्रतिभेमुळे झाला. पण प्रतिभा कुठं आहे?
     सिनियर बोलायचे थांबले म्हणून ज्युनियर म्हणाला, खूप गहन होत चाललंय सर.
     सिनियर सावकाश चिंतनात हरवून बोलू लागले, हो. गहन आहेच रे हे सगळं. खूप खोल जावं लागतं. प्रतिभा हृदयात असते असं म्हणतात. आपणही गृहीत धरू तसं. गायक गाण्याचा रियाझ करतो. म्हणजे गाण्याचा व्यायामच ना. चित्रकार चित्र काढण्याची सवय ठेवतो. म्हणजे चित्र काढण्याचा व्यायाम. लेखक लिहित राहतो. म्हणजे लिहिण्याचा व्यायाम. आपण लेखक आहोत म्हणून लेखकावर फोकस करू. लेखक इतके श्रम करून लिहितो, त्या लिखाणाचं नेमकं काय होतं? कुठंतरी छापून येतं. नंतर त्याचं पुस्तक होतं. पण ते पुस्तक सर्वदूर पोचावं यासाठी आपण, प्रकाशक वा साहित्य रसिक काही खास प्रयत्न करतो का?  लेखक जे लिहितो ते मर्यादित रसिकापर्यंतच पोचतं. आपल्या भाषेच्या लोकांपर्यंत पुस्तक सर्वदूर जाऊन धडकत नाही. एखाद्या घरी पोचतं पण त्या घरातले सगळे लोक तरी ते पुस्तक वाचतात का? एखाद्या ग्रंथालयात पोचतं आणि तिथंच पडून राहतं ना नुसतं? सर्क्युलेट होत नाही. तुझं मी वाचायचं आणि माझं तू. हे साटंलोटंच झालं ना कॉलेजात एकमेकांना भाषणाला बोलवल्यासारखं.
     सिनियरला रिलिफ मिळावा म्हणून ज्युनियर मध्येच म्हणाला, साहित्य वाचन चळवळ जोरात राबवायला हवी. मागे मी सांस्कृतिक दुष्काळाची डायरी लिहिली होती पहा. यावर भर द्यायला हवा.
     धागा पकडत सिनियर पुढे म्हणाले, तसंच असं नाही, ते ही बरोबर आहेच. परंतु जे लिहिलं जातं.. लिहून झालं आहे.. छापून झालं आहे.. वितरीत झालं आहे.. त्याची लागण का होत नाही दूर दूर पर्यंत? ते वादळासारखं पसरलं पाहिजे वेगानं, इतकं की एकानं वाचलं की त्याने दहा जणांना सांगून त्या दहा जणांनी झपाटून वाचलं पाहिजे. आणि त्यापुढे प्रत्येकाचे पुन्हा दहा दहा. दहाच का? दहाचे शंभर, शंभराचे हजार अशा रीतीने ...पुस्तकाची लागण झाली पाहिजे साथीच्या आजारासारखी. वाईट गोष्टी कशा स्प्रेड होतात सोशल नेटवर्कवरून तसं पुस्तकांचं झालं पाहिजे...
     सिनियर श्वासासाठी थांबताच ज्युनियर म्हणाला,
     " तसं होतंही. पण ते लोकप्रिय साहित्याबद्दल होतं. अभिजात साहित्याबद्दल असं होत नाही. बाबा कदम जितके वाचले जातील तितके श्याम मनोहर वाचले जात नाहीत. गुलशन नंदा जितके वाचले जातात तितके भालचंद्र नेमाडे वाचले जात नाहीत. दुसरा मुद्दा आजचे अनेक चांगले लेखक वाचकांना माहीत नाहीत. अजूनही अनेक वाचक ययाती, मृत्यूंजय, स्वामी या पुस्तकांनाच मानदंड मानतात. काही लोक तर न वाचताच ही पुस्तकं वाचल्याची नावं सांगत राहतात.
     सिनियर नाहीतली मान हलवत म्हणाले, तुझा हा मुद्दा मला तितकासा पटला नाही. कारण की, ज्ञानेश्वरी कशी वाचली जाते अजूनही घराघरात? तुकारामांची गाथा वाचली जाते ना अजून घराघरात? यावरही बोललं पाहिजे.
     ज्युनियरचे उत्तर तयार होते, हो सांगतो ना. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा घराघरात आजही वाचली जाते. पण त्याच्यातले काव्य वा तत्वज्ञान भिडतं म्हणून ती वाचली जात नाहीत. म्हणजे तत्वज्ञान वा काव्यानंदासाठी ती वाचली जात नाहीत. धार्मिक ग्रंथ म्हणून केवळ श्रध्देने ती वाचली जातात हे खरं कारण. जर या ग्रंथांत अध्यात्म नसतं वा त्यांचे कर्ते संत नसते तर हे साहित्यही दुर्लक्षित झालं असतं इतर अभिजात साहित्याप्रमाणे.
     सिनियर कबूल करत म्हणाले, तुझ्या म्हणण्यात तथ्य आहेच. नाही असं नाही. पण मला दुसरी शंका येते
 ‘कोणती?
 "अजून तशी लिखित कलाकृतीच निर्माण झाली नसेल कदाचित? आपल्या प्रतिभेची निर्मितीच कमी पडते की काय. लेखकाला लिहायच्या मर्यादा पडत असाव्यात? सृजनाचाही व्यायाम असायला हवा, तो कमी पडतो की काय, अशी शंका आहेच." प्रश्न उपस्थित करून सिनियर थांबले. 
      विचारांची लिंक लावत ज्युनियर म्हणाला, "सृजनाचा व्यायाम असतोच. पण हे सुध्दा पूर्ण सत्य नाही. विलास सारंग, जी.ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे... ह्यांची निर्मिती कमी पडते असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. त्यांना मर्यादा आहेत असंही नाही. इतकं अभिजात लिखाण येऊनही अनेक वाचकांना ते ऐकूनही माहीत नसतील तर आपण उपस्थित केलेला मुद्दा बरोबर नाही असं मला वाटतं...तेव्हा ’’ ज्युनियरने आपले म्हणणे अर्ध्यावर सोडून दिलं. यावर सिनियर काही बोलत नाहीत म्हणून ज्युनियर मनात म्हणाला,
     वाचन ही जीवनावश्यक गरज नाही असं म्हणता येईल...

     (गोव्याच्या ‘सहित’ प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या ‘टिंब’ या कादंबरीचा दिनांक 30-11-2019 च्या अक्षरनामा प्रकाशित झालेला अंश. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
 ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/